Tuesday, May 26, 2009

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री
ठेवा या लक्षात या गोष्टी
माझ्याशी सुद्धा कराल ना तुम्ही गट्टी??
प्रत्येक पोर्णिमेच्या चंद्रात -
आपण तिलाच् शोधत फिरतो..
प्रत्येक नविन कविता -
तिलाच् अर्पण करतो..
तिला मात्र तरीही काहिच् उमगत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!

उशीर झाला असला की-
आपण घाई घाई करतो!
मेटाकूटीने चढून आपण-
बसमध्ये उभे ठाकतो!
मुलीशेजारी बसण्याचं तरीही धाडस होत नसतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडत असतं!
चित्रपट पाहून आल्यावर-
आपण उद्दात्तं विचार करतो!
कोणीतरी मोठं बनण्याच्या -
इर्षेला आपण पेटतो!
इर्षावगॅरे सगळं रात्रीपुरतच् टिकणारं असतं!
आपल्या सर्वांच्याच् बाबतीत असच् घडतं.

No comments: