Thursday, June 23, 2011

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात....

मित्रहो ,

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..

प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..

मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' केलं जातं. ..

'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..


ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..

मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला 'Net''ची जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैत्रीचे खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....

No comments: