Tuesday, March 6, 2012

कालिदास मेघांबरोबर संदेश पाठवीत असे

कालिदास मेघांबरोबर संदेश पाठवीत असे, तर कलादास सुगंधाबरोबर संदेश पाठवतो...प्रेयसीला....हाहाहा...या गीताला सुंदर चाल माझ्या धाकट्या भावाने बांधली आहे...

सुगंधांनो, जा दूर देशी, माझ्या प्रियेच्या घराशी...
तुम्ही घ्या विसावा, कुठे फुलापाशी...!! धृ !!

...हळू पावलाने जा तरी तियेपाशी...
बनुनी खट्याळ, वस्त्रे, ढळवा करी जराशी...
अन जागवा गंध माझा, उघडून प्रेमकोषी ... !! १ !! सुगंधांनो...

करा गुज माझ्या, त्या, लाडक्या प्रियेशी...
पुसा क्षेम सारे, ती किती दु:ख सोशी?...
उलघाल या जीवाची, न्या तिचे अंतराशी.....!! २ !! सुगंधांनो...

करितो प्रणाम दोन्ही, कर जोडूनी तुम्हासी...
माझा निरोप हाची, पोचवा तियेसी ....
तुटताच बंध सारे, येईन भेटण्यासी..........!! ३ !! सुगंधांनो...

मृदू बंधने अशी की, मी तिच्या प्रेमपाशी,
धरी धीर थोडा, परवशता ही जराशी...
मारून टाच अश्वाला, जाऊ सवे दूर देशी....!! ४ !! सुगंधांनो...

आश्वासुनी वदावे की, ज्या ज्या स्थळी तू वससी...
विज्ञान ज्ञान तेथेची, मज तीर्थ काशी...
अन एक थेंब अश्रू , मज पुरे तारण्यासी...!! ५ !! सुगंधांनो...

मासोळी जलाविणा, राहावी तरी कशी...
मृगवृष्टी कधी बा व्हावी, ही प्रतीक्षा चातकासी...
ओळखे गुज सर्वांचे, कलादास या समेशी....!! ६ !! सुगंधांनो...

No comments: