Sunday, December 25, 2011

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं!

सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं!
त्यात जमिनीवर राहुण आकाशात उडायच असतं,
आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं,
हीच माझी ओळख अस नशीब म्हणत असतं,
ऊन एकट कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं,
फक्त सावलीला प्रकट व्हायला झाडाच अस्तित्व लागतं,
चांदण्याला महत्व अंधारामुळेच येतं,
दु:खाच अन सुखाच हेच नात असतं,
दु:खच नसेल आयुष्यात, तर सुखाची मजा घेता येईल का ?
ओलं न होता कधितरी पावसात भिजता येईल का?

No comments: